कोरोना प्रतिबंधक लसींचा महाराष्ट्रात तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या मोजकाच साठा असल्याचा दावा महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रापेक्षा गुजरात आणि राजस्थान राज्याला जास्त कोरोना लसी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरुन महाराष्ट्र सरकारमधील नेते आणि भाजप नेते तसेच केंद्र सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचं बघायला मिळत आहे.