ज्या जमीन व्यव्हाराप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचं मंत्रिपद गेलं त्याच प्रकरणात खडसेंचं पाऊल आणखी खोलात जाण्याची चिन्हं आहेत. कारण खडसेंनी मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचं निरीक्षण ईडी कोर्टाने वर्तवलं आहे. एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदावर असताना पदाचा गैरवापर करत स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना फायदा करुन दिला, असंही कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अशा परिस्थितीत जामीन देता येणार नाही, अन्यथा समाजात वाईट संदेश जाईल, असंही कोर्टाने ठणकावून सांगितलं.