नवी मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये फळांचे भाव चांगलेच वाढले आहेत. गणेशोत्सवामुळे हे फळांचे भाव वाढले असल्याचे सांगितले जात आहे. गणेशोत्सवामुळे फळ खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी मार्केटमध्ये केली आहे. फळांची आवक कमी आहे. मात्र, त्या तुलनेमध्ये मागणी मात्र जास्त आहे. यामुळे फळांचे भाव चांगलेच वाढले आहे. तसेच पुढील काही दिवस फळांचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. सफरचंद, संत्री, केळी, मोसंबी, डाळिंब, अननस आणि पेरूच्या भावामध्ये चांगलीच वाढ झाली आहे.