अविनाश माने, मुंबई : मुंबईत आता वाहनचालकांना कोणत्याही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. बीकेसी एमटीएनएल जंक्शन ते मुलूंड लाल बहादूर शास्त्री मार्गापर्यंत वेगवान प्रवास करता येणार आहे. या मार्गादरम्यान येणाऱ्या तीन सिग्नलपासून वाहतूकदारांची सुटका होणार असून वेळेची मोठी बचतही होणार आहे. याकरता पालिका २९.९९ कोटी रूपयांचा उड्डाणपूल बांधणार आहे. महापालिका एलबीएस रोड, कल्पना सिनेमा ते चेंबूर सांताक्रूझ या मार्गावर हा उड्डाण पूल बांधणार आहे. बघा काय आहेत या उड्डाण पूलाची वैशिष्ट्ये…