राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर काय म्हणाले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण?

राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर काय म्हणाले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण?

Harshada Shinkar | Updated on: Feb 17, 2023 | 2:13 PM

VIDEO | राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर माजी मुख्यमंत्री म्हणाले, न्यायास विलंब हा न्याय नाकारणे...

नांदेड : राज्यातील सत्तासंघर्षावर आठ महिन्यानंतरही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला नाही. आता या प्रकरणावर येत्या मंगळवारी म्हणजे 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 10. 30 वाजता ही सुनावणी होणार आहे. यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाष्य केले आहे. न्यायालयीन प्रक्रियेला वेळ लागतो हे ठीक आहे, मात्र विलंब होऊ नये. तसेच वारंवार सुनावणी पुढे ढकलल्या जात असल्याने उशिराने दिलेला न्याय हा न्याय नाकारण्यासारखे होऊ नये, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर दिली आहे. सात घटनापीठाच्या खंडपीठासमोर हे प्रकरण न्यायचे का? याबाबत दोन्ही बाजूकडे भूमिका मांडण्यात आली आहे. आता यावर सर्वोच्च न्यायालय योग्य तो निर्णय घेईल, असेही अशोक चव्हाण म्हणाले आहे.


        
Published on: Feb 17, 2023 2:13 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us