Harshwardhan Jadhav | कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

| Updated on: Sep 02, 2021 | 1:57 PM

सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झालाय. केळी, मोसंबी, कांदा, कापूस, अद्रक पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. विनायक पाटील या शेतकऱ्याची 10 एकरवरील तीन वर्षाची मोसंबीची बाग वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

Follow us on

सोमवारी रात्री झालेल्या पावसानं कन्नड तालुक्यातील बेलदरीतील पाझर तलाव फुटला. त्यामुळे धरणक्षेत्रातील 100 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर 11 गावात पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. त्यानुसार आता ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी विभागाच्या माध्यमातून पंचनामे सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची मागणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केलीय. जाधव यांनी गुरुवारी तहसील कार्यालयावर आंदोलनाचा इशाराही दिला आहे.  सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झालाय. केळी, मोसंबी, कांदा, कापूस, अद्रक पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. विनायक पाटील या शेतकऱ्याची 10 एकरवरील तीन वर्षाची मोसंबीची बाग वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे.