मुंबई : मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी दिलेला शब्द मोडला, असं म्हणत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी टीका केली. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची निवडणूक लढवणार नाही आणि त्यामागची कारणं नेमकी काय आहेत, हे देखील स्पष्ट केलं.