सर्व राज्यभरात लाडक्या बाप्पाचे आगमन झालेले असताना सर्वत्र गणेशभक्त मोठ्या श्रद्धेने लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापणा करत आहेत. गणेशोत्सवानिमित्त राज्यात उत्साहाचं वातावरण आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे यंदाचाही गणेशोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. अशावेळी मुंबई, पुण्यासह राज्यात विविध भागात साधेपणाने गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आलीय.
राजकीय नेतेमंडळींच्या घरीही अगदी साधेपणाने गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी देखील गणरायाचे आगमन झालेले आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियासोबत मिळून देवाची पुजा करुन बाप्पाचं आगमन केलं आहे.