भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारनं ओबीच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप केला. सुप्रीम कोर्टाच्या सूचना राज्य सरकारनं पाळल्या नाहीत. इम्पिरिकल डाटा राज्य सरकारनं गोळा केला नाही. 18 महिन्य़ानंतर आगोयाची स्थापना करण्यात आली. अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे आता राज्यातील ओबीसी मंत्री कुठं आहेत. ते सर्व पवारांच्या ताटाखालील मांजर झाल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.