मुंबई : लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार खासगी रुग्णालयात उपलब्ध असलेला लससाठा घेणार आहे. वेळोवेळी हा लससाठा तो रुग्णालयांना परतही केला जाईल. खासगी रुग्णालयांत उपलब्ध असलेल्या लसींची मुदत संपण्याची शक्यता असल्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.