लोकसभा निवडणुकीला दीड आणि विधानसभा निवडणुकीला अजून पावणे दोन वर्षे इतका काळ बाकी आहे. आयुष्यात मी पण सर्व्हे पाहिले आहेत. जे सर्व्हेत दाखवलं जातं त्याच्याविरुद्ध दिसलेलं आहे. त्यामुळे माझा सर्व्हेवर विश्वास नाही. जनतेचं मत आमच्यासाठी महत्वाचं आहे. त्यांचं मत निवडणुकीच्या काही दिवस आधी बनतं. मला आठवत ज्यावेळेस मी निवडणूक हरलो होतो. तेव्हा सर्व्हेत मला विजयी दाखवलं होतं. तर ज्यावेळेस मी जिंकलो होतो तेव्हा सर्व्हेने प्रतिस्पर्धीला 85 हजार मतं दाखवली होती. त्यामुळे मला सर्व्हेवर विश्वास नाही, असं गुलाबराव पाटील म्हणत यांनी सी वोटर सर्व्हेवर प्रतिक्रिया दिली आहे.