मुंबई : मुंबईमध्ये आज दिवसभर पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना घरी जाण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुंबईकर सध्या ठिकठिकाणी बसची वाट पाहात उभे असलेले पाहायला मिळत आहेत. जागोजागी ट्रॅफिक जॅम झाल्यामुळे सगळ्यांची तारांबळ उडाली आहे.