कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांनसाठी नवी मुंबईतून मदतीचा ओघ सुरुच आहे. आज भाजपा आमदार गणेश नाईक यांच्या मार्फत तब्बल 8 ट्रक भरून मदत पुरग्रस्तांनसाठी पाठविण्यात आलीये. यामध्ये अन्नधान्यासह दैनंदिन जीवनात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. नवी मुंबईतील प्रत्येक नोडमधील भाजपा कार्यकर्त्यांनी एकत्र येत पुरग्रस्तांना या संकटातून सावरण्यासाठी हे मदत कार्य पाठविण्यात आले असून मदतीचा हा ओघ पुढेही असाच सुरू राहील अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केलीय.