मुंबई: “मंत्री मंडळ बनत असताना, शिवसेना-भाजपाची आघाडी होती. नऊ-नऊ जणांचं मंत्रिमंडळ करायचं ठरलं असेल. तसं मंत्रिमंडळ बनलं असेल. माझी अशी कुठलीही नाराजी नाही. अपक्ष म्हणून 30 हजाराच्या मताधिक्क्याने जनतेने मला निवडून दिलं. लोकांना मी विकासाचं आश्वासन दिलं होतं. आज बेरोजगारीचा प्रश्न आहे. रिकाम्या हाताला काम देणं, माझ्यासाठी महत्त्वाचं आहे” असं अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले.