औरंगाबाद : देशात सध्या बाबरी मज्जिदनंतर ज्ञानवापीचा मुद्दा गाजत आहे. यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी ज्ञानवापीच्या मुद्द्यावर बोलत असताना भाजपवर अप्रत्यक्षपणे टीका केली. इतिहासात झालेली चूक पुन्हा काढण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया जलील यांनी दिली. देशात इतर मुद्दे असताना तुम्ही ज्ञानवापीवरच का अडकून पडलात अशी प्रतिक्रिया जलील यांनी दिली. भाजपला मिळालेली खुर्ची ही RSS ने दिलेली आहे.