जीएसटीवर मोदी सरकारचा मोठा निर्णय! दिवाळीत देणार सरप्राइज, काय स्वस्त, काय महाग?
भारत सरकारने जीएसटीमध्ये महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. १२ आणि २८ टक्के जीएसटी स्लॅब रद्द करून पाच आणि १८ टक्के असे दोन स्लॅब राहील. २२ सप्टेंबरपासून हे नवीन दर लागू होतील. दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू स्वस्त तर काही लग्झरी वस्तू महागणार आहेत. आरोग्य आणि जीवन विमा करमुक्त राहणार आहे.
भारत सरकारने जीएसटीमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. १२ आणि २८ टक्क्यांचे जीएसटी स्लॅब रद्द करण्यात आले असून, आता पाच आणि १८ टक्क्यांचे दोन स्लॅब राहणार आहेत. हे बदल २२ सप्टेंबरपासून लागू होतील. या निर्णयामुळे दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंवर कर कमी होईल, जसे की काही पदार्थ आणि कपडे. मात्र, आलिशान गाड्या, साखरेचे पेये आणि फास्ट फूड महागणार आहेत. लग्झरी वस्तूंवर ४० टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. आरोग्य आणि जीवन विमा हप्तांवर जीएसटी लागणार नाही. सरकारने या बदलांना “जनतेसाठी गिफ्ट” असे संबोधले आहे.
Published on: Sep 04, 2025 9:57 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
