मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने जैन समाजाची याचिका (Jain Community Petition) फेटाळली आहे. मांसाहारी खाद्यपरार्थांच्या जाहिरात बंदीची याचिका जैन समाजाने केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) फेटाळली आहे. त्रास होत असल्यास टीव्ही बंद करा, असं म्हणत कोर्टाने जैन समाजाला सुनावलं आहे. तसंच नव्याने ही याचिका दाखल करण्याची मुभादेखील याचिकाकर्त्या जैन समाजाला न्यायालयाने दिली आहे.