हतनूर धरणाच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ, 12 दरवाजे पू्र्ण उघडले. 18187 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. मुंबईसोबतच राज्यातील जालना, बीड, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची हवामान विभागाने वर्तवली आहे. मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.