मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरील कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींवर झालेली कारवाई म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरु झालं आहे. लक्षद्विपच्या राष्ट्रवादीच्या खासदारांना न्यायालयाने दिलासा देवूनही त्यांना अद्यापही पुर्ण खासदारकी बहाल झालेली नाही. तशीच परिस्थीती राहुल गांधीची करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं जयंत पाटील म्हणालेत. राहुल गांधीच्या फोटोला चप्पलने मारणाऱ्या भाजप आमदाराने मारणे ही कृती बरोबर नाही. ह्या कृती बाबात कारवाईची मागणी केली. सत्तेत बसलेले कसे वागतात हे सर्वजण बघत आहेत, असंही जयंत पाटील म्हणालेत.