उद्धव ठाकरे आज ठाण्यात आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड पोहोचले होते. तेव्हा टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. उद्धव ठाकरे हे निर्मल मनाचे नेते आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमुळे माझा जीव वाचला. कोरोना काळात मी आजारी असताना त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलंय. या दोघांमुळेच मी जिवंत आहे, असं आव्हाड म्हणालेत.