राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
राहुल गांधी एकीकडे गृह मंत्रालयाला प्रश्न विचारतात असं कंगना राणावतने म्हटलंय. तर दुसरीकडे तेच गृह मंत्रालयाला बोलू देत नाही असंही तिने म्हटलंय. विरोधकांकडे मांडण्यासारखे महत्त्वपूर्ण मुद्दे उरलेलेच नाहीत असं कंगना राणावत यांनी म्हटलेलं आहे. इथे संपूर्ण वातावरण खराब करून ठेवलं आहे. आणि जसं तुम्ही पाहताय, दिवसेंदिवस इथलं वातावरण खूप जास्त खराब होत चाललं आहे. आणि […]
राहुल गांधी एकीकडे गृह मंत्रालयाला प्रश्न विचारतात असं कंगना राणावतने म्हटलंय. तर दुसरीकडे तेच गृह मंत्रालयाला बोलू देत नाही असंही तिने म्हटलंय. विरोधकांकडे मांडण्यासारखे महत्त्वपूर्ण मुद्दे उरलेलेच नाहीत असं कंगना राणावत यांनी म्हटलेलं आहे. इथे संपूर्ण वातावरण खराब करून ठेवलं आहे. आणि जसं तुम्ही पाहताय, दिवसेंदिवस इथलं वातावरण खूप जास्त खराब होत चाललं आहे.
आणि राहुल गांधी जे आहेत, ते गृह मंत्रालयाला प्रश्न विचारत आहेत, पण म्हणत आहेत की गृह मंत्रालयाला आम्ही बोलू देणार नाही. ह्या कसल्या गोष्टी आहेत? त्यांना म्हणत आहेत चर्चा करा, तर म्हणतात आम्हाला उत्तर नको आम्हाला चर्चा हवी. मग म्हणतात चर्चा करा, तर म्हणतात आम्हाला चर्चा नको उत्तर हवं. हे शब्दांमध्ये गुंतवत आहेत. याचा अर्थ यांच्याकडे काही मुद्दा नाहीये. विरोधी पक्षाकडे काही मुद्दा नाहीये. विकासाबाबत, देशाच्या प्रगतीबाबत, आर्थिक व्यवस्थेबाबत, संरक्षणाबाबत जेव्हा काही मुद्दा उरलेला नाही, तेव्हा हे आपले नखरे दाखवत आहेत इथे.
