Kapil Patil | पाकव्याप्त काश्मीर 2024पर्यंत भारतात येऊ शकतो, मोदी असल्यामुळे शक्य : कपिल पाटील

| Updated on: Feb 02, 2022 | 6:23 AM

लोकांनी कांदे, बटाटे, मूग डाळ, तूर डाळ यातून बाहेर पडले पाहिजे कारण देशच नसेल तर खरेदी करणार कुठून असे विधान केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याणमध्ये केले आहे. कल्याणमध्ये सुभेदार वाडा कट्टातर्फे आयोजित स्वर्गीय राम कापसे व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

Follow us on

मुंबई : कपील पाटील यांनी पाकव्यात काश्मीराबाबत मोठे वक्तव्य केले. कदाचित 2024 पर्यंत पाकव्याप्त काश्मीर हा भारतात येऊ शकतो अशी अपेक्षा करायला हरकत नाही कारण मोदी हे करू शकतात. लोकांनी कांदे, बटाटे, मूग डाळ, तूर डाळ यातून बाहेर पडले पाहिजे कारण देशच नसेल तर खरेदी करणार कुठून असे विधान केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याणमध्ये केले आहे. कल्याणमध्ये सुभेदार वाडा कट्टातर्फे आयोजित स्वर्गीय राम कापसे व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.