AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्य, चंद्राला देव न मानणाऱ्या दलित कवीची कविता पुस्तकातून हटवा, कर्नाटकातील भाजप सरकारचा आदेश

समितीद्वारा सुचवण्यात आलेल्या बदलानंतर अखेर ही कविता अभ्यासक्रमातून हटवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय.

सूर्य, चंद्राला देव न मानणाऱ्या दलित कवीची कविता पुस्तकातून हटवा, कर्नाटकातील भाजप सरकारचा आदेश
कवी सिद्धलिंगैय्याImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 13, 2022 | 10:49 AM
Share

मुंबई : शालेय शिक्षणातून एका दलित कवीची कविता हटवण्याचा निर्णय कर्नाटक सराकराने (Karnataka Government) घेतला. इयत्ता चौथीत एक दलित कवीची (Dalit Poet) कविता अभ्यासाला होती. ही कवित हटवण्यात यावी, असा आदेश कर्नाटकच्या शिक्षण मंत्र्यांनी घेतला आहे. सूर्य आणि चंद्राला देव न मानणाऱ्या कर्नाटकातील प्रसिद्ध दलिती कवीची कविता वगळण्यात यावी, असे निर्देश देण्यात आलेत. ही कविता धार्मिक भावना दुखावणारी आहे, अशा अनेक तक्रारी कर्नाटकच्या शिक्षण मंत्र्यांना (Education news) आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतलाय. दिवगंत कवी सिद्धलिंहैया यांनी ही कविता लिहिलेली होती. वगळ्यात आलेल्या या कवितेचं नाव ‘भूमि’ असं होतं. नवभारत टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलंय.

काँग्रेसच्या काळात कवितेचा समावेश

ही कविता काँग्रेसच्या काळात अभ्यासात आणली गेली होती. बारगुरु रामचंद्रप्पा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली होती. या समितीने शैक्षणिक अभ्यासक्रम तयार केला होता. पाठ्यपुस्तकाबाबत करण्यात आलेल्या संशोधन समितीनं ही कविता इयत्ता चौथीच्या अभ्याक्रमात समाविष्ट केली होती.

अनेकांना या कवितेबाबत आक्षेप नोंदवला होता. या पाठ्यपुस्तकातील नाली-काली खंड आपल्या वादग्रस्त माहित्यामुळे काहींच्या धार्मिक भावना दुखावतो, अशी तक्रार नोंदवण्यात आली होती. अनेकजण सूर्यास आणि चंद्रास देवतेच्या समान मानतात. अशावेळी ही कविता भावना दुखावणारी असून ती शालेय अभ्यासक्रमातून वगळावी, अशी मागणी जोर धरत होती. धार्मिक मठ हे धोका देणारं एक जाळं आहे, अशीही एक ओळ यात लिहिण्यात आली होती.

तीव्र विरोधानंतर निर्णय

दरम्यान, तीव्र विरोधानंतर कर्नाटकातील भाजर सरकराने ही कविता वगण्याचा निर्णय घेतला आहे. तीव्र विरोधानंतर रोहित चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीद्वारा सुचवण्यात आलेल्या बदलानंतर अखेर ही कविता अभ्यासक्रमातून हटवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय. कर्नाटकचे शिक्षण मंत्री बी.सी नागेश यांनी याबाबतचे आदेश संबंधित यंत्रणांना दिलेत.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.