AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्य, चंद्राला देव न मानणाऱ्या दलित कवीची कविता पुस्तकातून हटवा, कर्नाटकातील भाजप सरकारचा आदेश

समितीद्वारा सुचवण्यात आलेल्या बदलानंतर अखेर ही कविता अभ्यासक्रमातून हटवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय.

सूर्य, चंद्राला देव न मानणाऱ्या दलित कवीची कविता पुस्तकातून हटवा, कर्नाटकातील भाजप सरकारचा आदेश
कवी सिद्धलिंगैय्याImage Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Jun 13, 2022 | 10:49 AM
Share

मुंबई : शालेय शिक्षणातून एका दलित कवीची कविता हटवण्याचा निर्णय कर्नाटक सराकराने (Karnataka Government) घेतला. इयत्ता चौथीत एक दलित कवीची (Dalit Poet) कविता अभ्यासाला होती. ही कवित हटवण्यात यावी, असा आदेश कर्नाटकच्या शिक्षण मंत्र्यांनी घेतला आहे. सूर्य आणि चंद्राला देव न मानणाऱ्या कर्नाटकातील प्रसिद्ध दलिती कवीची कविता वगळण्यात यावी, असे निर्देश देण्यात आलेत. ही कविता धार्मिक भावना दुखावणारी आहे, अशा अनेक तक्रारी कर्नाटकच्या शिक्षण मंत्र्यांना (Education news) आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतलाय. दिवगंत कवी सिद्धलिंहैया यांनी ही कविता लिहिलेली होती. वगळ्यात आलेल्या या कवितेचं नाव ‘भूमि’ असं होतं. नवभारत टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलंय.

काँग्रेसच्या काळात कवितेचा समावेश

ही कविता काँग्रेसच्या काळात अभ्यासात आणली गेली होती. बारगुरु रामचंद्रप्पा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली होती. या समितीने शैक्षणिक अभ्यासक्रम तयार केला होता. पाठ्यपुस्तकाबाबत करण्यात आलेल्या संशोधन समितीनं ही कविता इयत्ता चौथीच्या अभ्याक्रमात समाविष्ट केली होती.

अनेकांना या कवितेबाबत आक्षेप नोंदवला होता. या पाठ्यपुस्तकातील नाली-काली खंड आपल्या वादग्रस्त माहित्यामुळे काहींच्या धार्मिक भावना दुखावतो, अशी तक्रार नोंदवण्यात आली होती. अनेकजण सूर्यास आणि चंद्रास देवतेच्या समान मानतात. अशावेळी ही कविता भावना दुखावणारी असून ती शालेय अभ्यासक्रमातून वगळावी, अशी मागणी जोर धरत होती. धार्मिक मठ हे धोका देणारं एक जाळं आहे, अशीही एक ओळ यात लिहिण्यात आली होती.

तीव्र विरोधानंतर निर्णय

दरम्यान, तीव्र विरोधानंतर कर्नाटकातील भाजर सरकराने ही कविता वगण्याचा निर्णय घेतला आहे. तीव्र विरोधानंतर रोहित चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीद्वारा सुचवण्यात आलेल्या बदलानंतर अखेर ही कविता अभ्यासक्रमातून हटवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय. कर्नाटकचे शिक्षण मंत्री बी.सी नागेश यांनी याबाबतचे आदेश संबंधित यंत्रणांना दिलेत.

Follow Us
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?