मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) राणा दाम्पत्यांच्या जामिनावर बोलताना म्हणाले, राणा दाम्पत्यांना जामीन मिळणे स्वाभाविक आहे. कारण हनुमान चालीसा (Hanuman Chaalisa) वाचणाऱ्यांवर राजद्रोह लावण्याचा करंटेपणा या सरकारने केला. त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय कोर्टात (Court) टिकू शकत नाही त्यामुळे राणा दाम्पत्यांना जामीन मिळणं स्वाभाविक आहे तो त्यांना मिळाला.