वकील गुणरत्न सदावर्तेंना मुंबई उच्च न्यायालयाने आक्षेपार्ह विधान प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी मंजुरी दिली होती. त्यामुळे सदावर्ते यांची आर्थर रोड कारागृहातून जामिनावर सुटका करण्यात आली. यानंतर आज माध्यमांशी बोलताना सदावर्तेंनी, ‘संघर्षाला आम्ही आनंदाने स्वीकारले,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी राज्यात आणीबाणीची स्थिती असल्याचं बोलून दाखवलंय. ते म्हणाले की,’ 1857 पासून जो संघर्ष देशाच्या इतिहासाचा हिस्सा आहे, तो संघर्ष आम्ही आनंदाने स्वीकारलेला आहे. संघर्षाला स्वीकारल्याशिवाय विजयी होता येत नाही. मुश्किलो के आगे जीत होती है. सत्य परेशान हो सकता है पराभूत नाही,’ असं सदावर्ते जामिनावर सुटका झाल्यानंतर मध्यमांशी बोलतांना म्हणालेत.