शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांच्या जवळचे अनेक लोक आहेत. अनिल देशमुखही मुख्यंत्र्यांच्या शरद पवारसाहेबांच्या जवळचे होते. अनिल परबच नाही तर अनेक लोक मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे नोटिसा पाठवल्या तरी आम्हाला फरक पडणार नाही, असं सांगतानाच लव लेटर येत आहेत. सरकारला दोन वर्षे होत आहेत. सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल. ‘दीवार टूटेगी नही, कितना भी सर पटकलो. दो साल से सर पटक रहे है, फिर भी दीवार टूटती नही. इतनी मजबूत दीवार है महाराष्ट्र सरकार की’. म्हणून त्यांनी लव लेटर पाठवलं. आम्ही त्याचं स्वागत करतो, असं राऊत म्हणाले.