शिंदे गटासह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. याचदरम्यान दोन्ही शिवसेनेकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी देखिल सुरू झाल्या आहेत. याचवेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाना साधताना, तोतयागिरीचा कळस उभारून बंड करण्यात आल्याचं म्हटलं आहे. तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवाजीराव आढळराव यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले काही मानसे ही ढळली मात्र खरे अढळ हे माझ्या सोबत आहेत. तर दसरा मेळाव्यासाठी शिवसेना पाठोपाठ आता शिंदे गटाने देखिल आपले पोस्टर रिलिझ केले आहे. त्यावर आम्ही विचारांचे वारसदार असं लिहलं आहे. त्यावरून अंबादास दानवे यांनी निशाना साधताना, शिवसेना फोडणारे कसले बाळासाहेबांचे वारसदार असा सवाल केला आहे.