सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांबाबत आज सुनावणी होणार आहे. यावेळी ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना आणि थेट नगराध्यक्षाबाबतही सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला गर्दी जमविण्याची जबाबदारी जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख तर मुंबईतील शाखा प्रमुखांवर देण्यात आली आहे. याचवेळी दसरा मेळाव्यात आमची ताकद दिसणार असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर 2014 मध्ये शिवसेनेनं काँग्रेसकडे सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव पाठवला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे तेथे होते असा गौप्यविस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. तर हे सरकार फक्त घोषणाबाजांचं सरकार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.