Maharashtra Budget 2025 : बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी नवी योजना… बळीराजा शेत अन् पाणंद रस्ते सुरु करण्यात येणार

Maharashtra Budget 2025 : बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी नवी योजना… बळीराजा शेत अन् पाणंद रस्ते सुरु करण्यात येणार

Harshada Shinkar | Updated on: Mar 10, 2025 | 3:31 PM

राज्याच्या प्रगतीत शेती क्षेत्राची भूमिका महत्त्वाची असून कृषी क्षेत्रासाठी काय तरतुदी केल्या जातात त्याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं असताना 2025-26 वर्षासाठीचा अर्थसंकल्प अजित पवारांनी सादर केला

बी बियाणे, यंत्रसामुग्री, खते आणि शेतमालाच्या वाहतूकीसाठी महत्वाच्या असलेल्या शेत व पाणंद रस्त्यांच्या बांधणीसाठी “बळीराजा शेत व पाणंद रस्ते” ही नवी योजना सुरू करण्यात येणार असल्याचे अजित पवारांनी सभागृहात सांगितले. यासह सन 2025-26 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरीता कृषि विभागास 9 हजार 710 कोटी रुपये, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्य व्यवसाय विकास विभागास 635 कोटी रुपये, फलोत्पादन विभागास 708 कोटी रुपये, मृद व जलसंधारण विभागास 4 हजार 247 कोटी रुपये, जलसंपदा व खारभूमी विभागास 16 हजार 456 कोटी रुपये, मदत व पुनर्वसन विभागास 638 कोटी रुपये, रोहयो विभागास 2 हजार 205 कोटी रुपये,सहकार व पणन विभागास 1 हजार 178कोटी रुपये, अन्न व नागरी पुरवठा विभागास 526 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. जानेवारी 2024 पासून आतापर्यंत 2 लाख 90 हजार 129 सौर कृषीपंप स्थापित करण्यात आले आहेत. सध्या प्रत्येक दिवशी सुमारे 1 हजार पंप या गतीने सौर कृषि पंपांची स्थापना करण्यात येत आहे. यासोबतच ज्या तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नाही, तेथे किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी “एक तालुका – एक बाजार समिती” योजना राबविण्यात येणार आहे.

Published on: Mar 10, 2025 3:31 PM
Follow Us