Marathwada Flood : मराठवाड्यात अतिवृष्टी, ओला दुष्काळ जाहीर होणार?

Marathwada Flood : मराठवाड्यात अतिवृष्टी, ओला दुष्काळ जाहीर होणार?

| Updated on: Sep 23, 2025 | 11:23 PM

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके बुडाली असून, शेतजमीन वाहून गेली आहे. सरकारने मदत जाहीर केली आहे, परंतु शेतकरी आणि मंत्री ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत.

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे पिके पूर्णपणे बुडाली आहेत आणि शेतीची जमीनही वाहून गेली आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी आणि सरकारचेच काही मंत्री ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत. सरकारने आतापर्यंत 2215 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे, परंतु शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की हे नुकसान भरपाई करण्यासाठी अपुगे आहे. ओला दुष्काळ जाहीर झाल्यास शेतकऱ्यांना पिक कर्ज फेडण्यासाठी मुदतवाढ, महसूल आणि इतर करांची वसुली स्थगित करणे, चारा, निवारा आणि अन्नधान्याची मदत तसेच मुलांच्या शिक्षणासाठी मदत मिळेल. जळगाव जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे तिथेही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आहे.

Published on: Sep 23, 2025 11:23 PM