मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा

मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा

| Updated on: Aug 17, 2026 | 2:59 PM

मनोज जरांगेची २९ ऑगस्ट पासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा. मराठ्यांना २९ ऑगस्टला अंतरवालीत या, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय. २९ ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार, जरांगेंचं वक्तव्य. मराठ्यांनी विषयी किती नीच पातळी असा पण या वेळेस आरक्षण तर द्याच, तुम्ही आता मराठ्याच्या प्रतिष्ठेला हात घातला ना? आरक्षण एक दिवस लेट, पण २९ ऑगस्टच्या नंतर आम्ही सरकारची […]

मनोज जरांगेची २९ ऑगस्ट पासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा. मराठ्यांना २९ ऑगस्टला अंतरवालीत या, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय. २९ ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार, जरांगेंचं वक्तव्य. मराठ्यांनी विषयी किती नीच पातळी असा पण या वेळेस आरक्षण तर द्याच, तुम्ही आता मराठ्याच्या प्रतिष्ठेला हात घातला ना? आरक्षण एक दिवस लेट, पण २९ ऑगस्टच्या नंतर आम्ही सरकारची जिरविणारच आता. होऊ दे काय व्हायचं ते. जरांगेंच्या आंदोलनानंतर 2023 पासून 3 लाख 11 हजार 860 ओबीसी प्रमाणपत्र मराठवाड्यात दिले. असं बबनराव तायवाडे यांनी म्हटलेलं आहे. या प्रमाणपत्रांपैकी केवळ 20 ते 25 हजार जणांनी जात वैधतेसाठी अर्ज केले. तायवाडे यांची माहिती. सरकारने सरसकट जात वैधता प्रमाणपत्र दिल्यास रस्त्यावर उतरणार, तायवाडे यांचा इशारा. आता त्या ओबीसी प्रमाणपत्रामध्ये त्यांनी अर्ज तर करायला पाहिजे ना लोकांनी? अर्ज केल्याशिवाय प्रमाणपत्र कसे मिळणार? 3 लाख 11 हजार प्रमाणपत्र इशू केले सरकार म्हणते. किती वर्षात? 23 नंतर, त्यांच्या आंदोलनानंतर. 24-10-2023 नंतर मराठवाड्यामध्ये 3 लाख 11 हजार 860 लोकांना प्रमाणपत्र निर्गमित केले. याच्यापैकी व्हॅलिडिटीसाठी किती लोकांनी अर्ज केले? फक्त 20 हजार.

Published on: Aug 17, 2026 2:59 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us