Manoj Jarange Patil : नीच औलादी…’तो’ मुंडेंचा PA, त्यानं मला ठार मारण्याचा… जरांगेंच्या खळबळजनक आरोपांनी महाराष्ट्र हादरले
मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत की, त्यांनी जरांगेंची हत्या करण्याचा कट रचला. जरांगेंच्या दाव्यानुसार, या कटात बीडच्या एका कार्यकर्त्याचा समावेश असून, खोटे रेकॉर्डिंग बनवणे, हत्या करणे किंवा औषध देऊन घातपात घडवणे असे तीन टप्पे ठरवले होते. या प्रकरणात एकूण १०-११ जणांचा समावेश असल्याचा आरोपही जरांगेंनी केला.
मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत दावा केला आहे की, मुंडेंनी त्यांच्या हत्येचा कट रचला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, हा कट रचण्यासाठी प्रथम खोटे रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात यश न मिळाल्याने, हत्येचा कट रचण्यात आला आणि नंतर औषध किंवा गोळ्या देऊन घातपात करण्याचा विचार झाला.
मनोज जरांगे पाटील यांनी या कटात बीड जिल्ह्यातील एका कार्यकर्त्याचा किंवा पीएचा समावेश असल्याचा उल्लेख केला, ज्याने काही आरोपींना परळी येथील एका रेस्ट हाऊसमध्ये धनंजय मुंडेंकडे नेले. तिथे ही बैठक भाऊबीजेच्या दिवशी झाल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
या कथित कटामध्ये एकूण १० ते ११ जणांचा समावेश असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. जरांगेंनी मराठा समाजाला शांत राहण्याचे आवाहन करत, या प्रकरणाचा मुळापासून तपास करणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी तपास यंत्रणांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आवाहन केले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

