पिंपरी चिंचवड : सत्य परेशान हो सकता हैं लेकिन पराजित नही, सत्यमेव जयते अशा शब्दात मिलिंद एकबोटे यांनी भीमा कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडे यांचे नाव आरोपपत्रातून वगळल्यानंतर प्रतिक्रिया दिली. भिडे आणि एकबोटे यांचे नाव जाणीवपूर्वक या प्रकरणात गोवल्याचा आरोप ही त्यांनी केलाय. शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात कायदेशीर सल्ला घेऊन अब्रुनुकसानीचा दावा करण्याचा निर्णय घेणार असल्याचे ही एकबोटे म्हणाले.