…आता तरी भाजपने देशहिताचं काम करावं – अस्लम शेख

| Updated on: Mar 11, 2022 | 11:27 AM

गुरुवारी पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालाची घोषणा झाली. यामध्ये चार राज्यात भाजपने बाजी मारली आहे. या निकालावर मंत्री अस्लम शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाला चांगले यश मिळाले आहे, आता त्यांनी देशहिताचं काम करावं असा टोला मंत्री अस्लम शेख यांनी लगावला आहे.

Follow us on

गुरुवारी पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालाची घोषणा झाली. यामध्ये चार राज्यात भाजपने बाजी मारली आहे. या निकालावर मंत्री अस्लम शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाला चांगले यश मिळाले आहे, आता त्यांनी देशहिताचं काम करावं असा टोला मंत्री अस्लम शेख यांनी लगावला आहे. पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत,  यामध्ये पाच पैकी चार राज्यात भाजपची सत्ता आली आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसने आपला धोबीपछाड देत सत्ता काबीज केली. हे निकाल काँग्रेससाठी निराशजनक राहिले आहेत. मात्र दुसरीकडे या विजयामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.