Maharashtra floods Relief: मंत्री मंगल प्रभात लोढांकडून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी हातभार, दिला 51 लाखांचा चेक, मुख्यमंत्री म्हणाले…
मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५१ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला दिला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये, विशेषतः मराठवाडा, नांदेड, जालना, बीड आणि सोलापूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
महाराष्ट्रामध्ये आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे करत मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ५१ लाख रुपयांची भरीव आर्थिक मदत केली आहे. राज्यातील पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी हा देणगी धनादेश सुपूर्द केला. गेल्या काही काळापासून मराठवाडा, नांदेड, जालना, बीड आणि सोलापूरसह महाराष्ट्राच्या विविध भागांना अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतीत आणि घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक कुटुंबांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर, मंत्री लोढा यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. मंत्री लोढा यांनी केलेल्या या महत्त्वपूर्ण योगदानामुळे पूरग्रस्तांच्या पुनर्वसन आणि मदतकार्याला निश्चितच बळ मिळणार आहे. त्यांच्या या संवेदनशील कृतीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष आभार मानले आहेत.
