मुंबई: “महाराष्ट्रात संभाजी नगरमध्ये येऊन ओवेसी बंधु औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहतात. माझ्या राजकीय जीवनात त्या कबरीवर फुल वाहिली हे फक्त मी उद्धव ठाकरे सरकारमध्ये पाहिलं. आम्ही हनुमान चालिसा वाचलं म्हणून तुरुंगात टाकलं, आमदार खासदारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला” अशा शब्दात आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली.