AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकांचा रोष थंड करण्यासाठी अधिकाऱ्यांना निलंबित करुन नंतर पुन्हा कामावर घ्यायचं, हे म्हणजे थंड करुन मलिदा खाणे : राजू पाटील

लोकांचा रोष असेल तर कोणालाही निलंबीत करायचे आणि नंतर कामावर घ्यायचे हीच यांची कामे आहेत. याला म्हणतात लोकांचा रोष थंड करुन मलिदा खाणे. हेच यांचे काम आहे, अशी खोचक टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेवर केली आहे.

लोकांचा रोष थंड करण्यासाठी अधिकाऱ्यांना निलंबित करुन नंतर पुन्हा कामावर घ्यायचं, हे म्हणजे थंड करुन मलिदा खाणे : राजू पाटील
मनसे आमदार राजू पाटील
Reporter Amjad Khan
Reporter Amjad Khan | Edited By: Chetan Patil | Updated on: Oct 21, 2021 | 11:06 PM
Share

ठाणे : लोकांचा रोष असेल तर कोणालाही निलंबीत करायचे आणि नंतर कामावर घ्यायचे हीच यांची कामे आहेत. याला म्हणतात लोकांचा रोष थंड करुन मलिदा खाणे. हेच यांचे काम आहे, अशी खोचक टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेवर केली आहे. ठाणे महापालिकेच्या निलंबित चार अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर घेतल्याने राजू पाटलांनी ही टिका केली. इतकेच नाही तर जे अधिकारी दोषी नव्हते त्यांच्या विरोधात कारवाई केली गेली होती, असाही आरोप मनसे आमदार पाटील यांनी केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

कल्याण पूर्व भागातील नेतिवली आणि श्रीकृष्ण नगर येथील विविध विकास कामांचे भूमीपूजन मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी दीपक यादव, महेंद्र कुंदे, तौफिक हुल्ले, मोहन गुप्ता हे उपस्थित होते. यावेळी मनसे आमदारांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला केला आहे. ठाणे महापालिकेतील निलंबित चार कार्यकारी अभियंत्यांना पुन्हा कामावर घेण्यात आलं आहे. याचं मुद्द्यावर भाष्य करताना राजू पाटलांनी शिवसेनेवर सडकून टीका केली.

राजू पाटील नेमकं काय म्हणाले?

“रस्त्याच्या पाहणीनंतर चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. खरे बघायले गेले तर हे रस्ते एमएसआरडीसी आणि पीडब्लू विभागांतर्गत येतात. त्यांच्यावर कारवाई न करता ज्यांचा काही दोष नव्हता त्यांच्या विरोधात कारवाई झाली. तसेच निलंबितांना तर पुन्हा कामावर घ्यावे लागेल. हा म्हणजे लोकांचा रोष थंड करुन मलिदा खायचा हा प्रकार आहे”, असा घणाघात राजू पाटलांनी केला आहे.

इतकेच नाही आधी बीओटी तत्वावर प्रकल्प विकसित करण्यासाठी दिले. ते धूळ खात पडले याहे. आधी बीओटी तत्वावर भ्रष्टाचार केला. आता पीपीपी तत्वावर म्हणजे खायचे धंदे सुरु आहेत, अशीदेखील टीका पाटील यांनी केली.

“कल्याण पश्चिमेतील वायलेनगर मधील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कला केंद्र आहे. याठिकाणी आता पोलीस उपायुक्त, प्रांत आणि निवडणूक कार्यालय आहे. बाळासाहेबांच्या नावाची साधी पाटी सुद्धा नाही. ज्यांनी आवाज उचलला त्या नगरसेवकाच्या विरोधात केस झाली”, असं राजू पाटील म्हणाले.

‘भारत-पाकिस्तान सामने खेळवले जाऊ नये’

एकीकडे देशाचे सैनिक धारातीर्थी पडत आहेत आणि दुसरीकडे वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान सामना खेळला जातोय. पाकिस्तानसोबत सामना खेळणे योग्य नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नेहमीच अशा प्रकाराला विरोध केला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली आहेत. त्याचा कल कोणत्या पक्षाच्या बाजूने आहे? असा सवाल करत मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की, प्रत्येक हिंदुस्तानी नागरीकाला वाटेल की भारत-पाकिस्तान समाना खेळवला जाऊ नये. मनसे आमदार कल्याणमध्ये रस्त्याच्या भूमिपूजनाला आले होते तेव्हा पत्रकरांनी प्रश्न विचारले असता त्यांनी वरील उत्तर दिले.

हेही वाचा :

VIDEO : काय चाललंय ठाण्यात? आता अंबरनाथमध्ये चोरट्यांनी चौकात उभ्या असलेल्या तरुणाच्या हातून मोबाईल हिसकावला

VIDEO | बॅनर लावण्यावरुन वाद, नालासोपाऱ्यात तीन मनसे कार्यकर्त्यांना जमावाची मारहाण

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभवला झंझावात खेळी करावीच लागणार, असं नाही केलं तर…काय घडणार?.

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभवला झंझावात खेळी करावीच लागणार, असं नाही केलं तर…काय घडणार?

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?.

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक.

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो.

तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो