भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती बैठकीत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बोलत होते.
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रविजी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आशीष शेलार, गिरीश महाजन आणि अन्य नेते, पदाधिकारी उपस्थित होते. नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारला 31 मे रोजी 8 वर्ष होत आहेत.
हे सेवेचे पर्व आहे,सुशासनाचे पर्व आहे,हे गरीब कल्याणाचे पर्व आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी नाही, तर प्रत्येक व्यक्तीला आपले मानत त्यांनी सुशासनाचा आदर्श उभा केला.आज जगातील अनेक देश महागाईने त्रस्त असताना त्यावर उपाययोजना करणारा भारत हा देश आहे.