MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी…काय बदलणार?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखत प्रक्रियेत महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. आयोगाच्या नव्या निर्णयानुसार, राज्यसेवा मुख्य परीक्षेनंतर होणाऱ्या मुलाखतीचे गुण कमी करण्यात आले असून, यापुढे मुलाखत 275 ऐवजी 175 गुणांची असणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखत प्रक्रियेत महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. आयोगाच्या नव्या निर्णयानुसार, राज्यसेवा मुख्य परीक्षेनंतर होणाऱ्या मुलाखतीचे गुण कमी करण्यात आले असून, यापुढे मुलाखत 275 ऐवजी 175 गुणांची असणार आहे.
एमपीएससीने जाहीर केलेल्या या निर्णयामुळे राज्यसेवा परीक्षेच्या एकूण गुणरचनेत महत्त्वाचा बदल होणार आहे. मुख्य परीक्षा आणि मुलाखत मिळून अंतिम गुणवत्तायादी तयार करण्याची पद्धत आता नव्या गुणसंरचनेनुसार निश्चित केली जाणार आहे.
आयोगाच्या या निर्णयाचा परिणाम राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांवर होणार असून, निवड प्रक्रियेत मुख्य परीक्षेच्या गुणांना तुलनेने अधिक महत्त्व मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, एमपीएससीकडून नव्या गुणपद्धतीबाबत अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली असून, ही सुधारित रचना आगामी राज्यसेवा परीक्षांपासून लागू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या बदलामुळे स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे नियोजन आणि गुणांचे महत्त्व यामध्येही बदल होण्याची शक्यता आहे.
