मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. येत्या 13 जुलैरोजी मुंबईत पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईतील काही उपनगरांत पाणी पुरवठा सुरळीत होण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत. असे असल्याने मुंबईकरांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे सकंटापूर्वीच नियोजन म्हणून मुंबईकरांनी पाणी जपून वापरणे गरजेचे आहे.