केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आज कुडाळमध्ये पोहोचली होती. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना, संजय राऊत अशी टीका केली तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ही इशारा दिला. पुन्हा घरावर याल, तर याद राखा असा इशारा राणेंनी यावेळी दिला.
इतक्या वर्षात माझ्या घरापर्यंत कोणी आलं नव्हतं पण यावेळी असं झालं हे मी कधीही विसरणार नाही असं राणेंनी म्हटलं. तसेच यापुढे माझ्यापर्यंत, मुलापर्यंत कोणी आल्यास याद राखा असंही राणे यावेळी बोलताना म्हणाले. त्यांनी यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही तुफान टीका केली.