नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर येतेय. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील नरसाळा इथे ही घटना घडली आहे. मौदा तालुक्यातील नरसाळा गावातील 15 वैदु कुटुंबांना गावातून हाकलून देण्यात आलं आहे. 15 वैदू समाजातील 75 जणांना गावातून हाकलण्यासाठी ग्रामपंचायतीनं पारीत केलं ठरावं. ‘दुसऱ्या जातीचे आणि राहणीमान नीट नसल्याने गावातून हाकलण्याचा डाव’करण्यात आला आहे. संविधानिक मानवाधिकाराचं हनन होत असताना प्रशासन गप्प? का असे अनेक प्रश्न इथे निर्माण होत आहेत. 10 वर्षांपासून वैदू समाजाचे लोक राहतात या गावात राहतात. गावोगावी भटकंती करुन जडीबूटी विकणारा वैदू समाज आहे. वैदू समाजाचे ना राशन कार्ड ना मुलांना शाळेत शिक्षण. आता प्रशासन यावर काय निर्णय घेणार हे महत्वाचं आहे.