आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल; काय होणार?

आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल; काय होणार?

| Updated on: Apr 22, 2026 | 3:47 PM

नाशिक आयटी कंपनीत अत्याचार आणि धर्मांतरणाच्या धक्कादायक प्रकरणाने खळबळ उडवली आहे. या प्रकरणात एकानंतर एक अपडेट समोर येत असताना सरकार आता थेट अॅक्शन मोडमध्ये आले आहे.. एकूणच शासनाची आता सर्व आयटी कंपन्यांवर करडी नजर असेल. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी नुकतेच महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

नाशिक आयटी कंपनीत अत्याचार आणि धर्मांतरणाच्या धक्कादायक प्रकरणाने खळबळ उडवली आहे. या प्रकरणात एकानंतर एक अपडेट समोर येत असताना सरकार आता थेट अॅक्शन मोडमध्ये आले आहे.. एकूणच शासनाची आता सर्व आयटी कंपन्यांवर करडी नजर असेल. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी नुकतेच महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

नवीन निर्देशांनुसार कॉर्पोरेटमध्ये कोणावरही दबाव, गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही. यावेळी त्यांनी महिलांसाठी विशेष अभ्यास गट स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. या गटाद्वारे सीआयएस प्रणालीचा वापर करून महिलांच्या अडचणी, तक्रारी नोंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विभागाकडून लवकरात लवकर उपाययोजनादेखील केल्या जातील.

नाशिक शहरातील एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांवर अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रयत्नांचे गंभीर प्रकार समोर आले होते. यानंतर पोलिस प्रशासन तसेच सरकार अलर्ट मोडवर आले आहे.

Published on: Apr 22, 2026 03:47 PM
Follow Us