नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूरत सत्र न्यायलयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. या सगळ्या घटनाक्रमाबाबात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. देशात लोकशाहीवर आक्रमण होत आहे. मी विचारलं होतं की 20 हजार कोटी कुणाचे? संसदेत मी पुरावे दिले, त्यानंतरचा सगळा घटनाक्रम लोकांच्या समोर आहे, असं राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अदानी यांचं नातं जुनं आहे. त्यावर सत्ताधारी बोलत नाहीत, असंही राहुल गांधी म्हणालेत.