नवी दिल्ली: मी लढण्यावर विश्वास ठेवते, हायकोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो. सुप्रीम कोर्टात जाऊन त्याव स्टे आणू असं नवनीत राणा म्हणाल्या. अमरावतीच्या जनतेने विरोधकांना पराभूत केले. एक्साईट होवून ते कोर्टात गेले आहेत.
भविष्यात न्यायाची अपेक्षा सुप्रीम कोर्टाकडून आहे. पॉलिटीकल खिचडी शिजलेली आहे. कोर्टाचा आदर करते व शिवसेनेशी लढाई सुरू राहील.मुख्यमंत्री लायक असते तर त्यांना इथं येण्याची गरज नसते. आईबाप मुलांसाठी कधी रडत नसतात.विविध विषयांच्या निमित्तानं त्यांना पीएमना भेटायचे होते. ही संधी त्यांनी साधली, असं नवनीत राणा म्हणाल्या.