अकोला : देवेंद्र फडणवीस यांनी इतर क्षेत्रात राजकीय क्षेत्रात ढवळाढवळ नक्कीच करावी. पण देहू देव सारख्या पवित्र ठिकाणी जिथे तुकोबारायांची आर्यभुमी राहिलेली आहे. कोणत्या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणजे भारताचे पंतप्रधान हे भारताच्या इतिहासात पहिल्यांदा प्रधानमंत्री कोणीतरी आलं त्यांचं मी स्वागतच करतो. प्रोटोकॉलनुसार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांना येथे बोलू न देणं. त्यामुळे भाजपची ही खेळी असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. देवेंद्र फडणीस सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोपही यावेळी मिटकरी यांनी केला आहे. राष्ट्रवादी पार्टी योग्य वेळी असे उत्तर की या लोकांना पळता भुई थोडी करेल, असे मिटकरी म्हणाले.