Gopichand Padalkar : माफीचा प्रश्नच नाही… फडणवीसांच्या तंबीनंतरही पडळकरांची मुजोरीची भाषा, बघा काय म्हणाले?

Gopichand Padalkar : माफीचा प्रश्नच नाही… फडणवीसांच्या तंबीनंतरही पडळकरांची मुजोरीची भाषा, बघा काय म्हणाले?

Harshada Shinkar | Updated on: Sep 19, 2025 | 5:24 PM

गोपीचंद पडळकरांच्या जयंत पाटील यांवरील आक्षेपार्ह वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून पडळकरांना समजावण्याची विनंती केली. फडणवीसांनीही पडळकरांना समज दिली असली तरी त्यांची भाषा बदलली नाही.

गोपीचंद पडळकरांच्या जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे. पडळकरांच्या या वक्तव्यावरून शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून चिंता व्यक्त केली. त्यांनी फडणवीसांना अशा बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवरावे अशी विनंती केली. फडणवीसांनी पवारांच्या फोनची पुष्टी केली आणि पडळकरांनाही समज दिली. मात्र, पडळकरांनी पवारांच्या फोनवरच प्रश्न उपस्थित केले आणि माफी मागण्यास नकार दिला. राष्ट्रवादी काँग्रेसने पडळकराविरोधात सांगली आणि जत येथे निदर्शनं केली. अजित पवार आणि रोहित पवार यांनीही पडळकरांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Published on: Sep 19, 2025 5:24 PM
Follow Us