अमरावतीतील संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. सध्या संत्राचा आंबिया बहार आलेला आहे. मात्र याचवेळी संत्र्यांवर “तडक्या” नावाचा रोग आलाय. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे संत्राची गळती होत आहे. परिणामी संत्रा उत्पादक पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. कृषी विभागाकडून संत्रा उत्पादकांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्याने संत्रा उत्पादकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.