नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची लोकसभा सदस्यता रद्द करण्यात आली. त्यानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी होत आहे. अशातच काँग्रेसचे नेते आशिष देशभुख यांनीही राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. “ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. माझ्या पाठिशी मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे. मतदानाच्या रूपाने ते आपले आशिर्वाद देत असतात. राहुल गांधी यांनी मोठ्या मनाने ओबीसी समाजाची माफी मागावी”, असं आशिष देशमुख म्हणाले आहेत.