शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्याने ठाकरे गट झाला आहे. यासोबतच शेतकरी जनहित संघटना आणि शेतकरी आक्रमक झाल्या आहेत. उस्मानाबादमधील अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाच्या विरोधात शेतकरी घोषणा देत आहेत. उस्मानाबाद येथील पीक विमा कंपनीचं कार्यालय फोडत या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर शाईफेक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना 2021 चा पीक विमा व 2022 च्या खरीप नुकसानीचे पैसे न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झालेत.